रत्नागिरी
रत्नागिरी जवळ असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकांना दिलेल्या नागरिकत्वाच्या दाखल्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आल आहे. संबंधित दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष रत्नागिरीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांपूर्वी एका तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आल आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यापूर्वीही जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांवरती कठोर कारवाई केली आहे. महिनाभरापूर्वी एका चिरेखणीवर वरती तेरा बांगलादेशी नागरिक मिळाले होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत असतानाही शिरगाव ग्रामपंचायतीकडून खोटा दाखला देण्यात आला होता, त्यामुळे या सगळ्याची गंभीर दखल करता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
मागील १० वर्षात सर्व ग्रामपंचायतींची दिलेल्या जन्म दाखल्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 12 तारखेला शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे.
काही दिवसापूर्वी शिरगांव ग्रामपंचायती कडून बांगलादेशी नागरिकाला खोटा जन्म दाखला देण्यात आला होता.. अश्या गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी,तसेच मागील १० वर्षात सर्व ग्रामपंचायतींची दिलेल्या जन्म दाखल्यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दोषी आढळल्यांवर गुन्हे दाखल करावे यासाठी भाजपा कडून जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेण्यात आली व निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.वर्षा ढेकणे,जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण,सुप्रिया रसाळ,विकी जैन,बाबू सुर्वे, शैलेश बेर्डे उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत मधील तत्कालीन सरपंच,उप सरपंच,सदस्य आणि ग्रामसेवक याची चौकशी करून शिरगांव ग्रामपंचायती हद्दीत चालणारे अनधिकृत व्यवसाय आणि बेकायदेशररित्या जमवलेली संपत्ती याची देखील चौकशी करण्याचे पत्र देण्यात येणार आहे.
दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी भारतीय जनता पक्ष रत्नागिरी च्या वतीने करण्यात आली आहे.
