रत्नागिरी
श्रीसंत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी राजापूर तहसीलदार कार्यालयात साजरी करण्यात आली त्यावेळी राजापूरच्या प्रभारी तहसीलदार दिपाली पंडित यांनी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आज आपण श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे गुणन करतो. पण ते अभंग आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी मुखोदगत करून पुन्हा लिहून काढले ते संत जगनाडे महाराज त्यांच्या पुण्य स्मरण करून त्यांची पुण्य तिथी साजरी करण्यात आली अशी माहिती पंडित यांनी दिली.
दिपाली पंडित पुढे म्हणाल्या की, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले.
संताजी महाराजांनी ‘तेलसिंधु, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचा नावाचे ग्रंथ लिहिले. त्यांनी सिंधु या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती दिलेली आहे. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगातून झळकत यावेळी “आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा | नंदी जोडीयेला मन पवनाचा ||
भक्ती हो भावाची लाट टाकीयीली। शांती शिळा ठेविली विवेकावरी।” हे अभंगाच्या ओळी म्हणून श्री संत जगनाडे यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना अभिवादन केल. यावेळी राजापूर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
