दापोली प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे सकल हिंदू समाज बांधवांकडून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अत्याचार विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. दापोली शहरातून काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पद्मश्री दादा इदाते, दापोलीच्या नगराध्यक्ष ममता मोरे, भाजप युवा मोर्चाचे अक्षय फाटक, विश्व हिंदू परिषदेचे नितीन सावंत शिवसेनेचे किशोर देसाई,उन्मेष राजे आदी अनेक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते ,वाडी प्रमुख मंदिरांचे पदाधिकारी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. विराट मोर्चा निघाला यावेळी बांग्लादेश मध्ये सुरू असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी एक है तो सेफ है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांना निवेदन देण्यात आले.
बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी हीच आमची मागणी.
बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर देखील तो अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलीत हिंदू बांधवांना ईस्लामी कट्टरतावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे.
बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे.
या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो.
या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोह्याची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे.
:
…
स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेश मधील हिंदूंची संख्या 38 टक्के होती ती घटून आज केवळ आठ टक्केच राहिली आहे. आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील 8% हिंदू व अन्य अल्पसंख्यांक समाज जिहादी इस्लामी कट्टरता वादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल, असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे.
त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की, बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांग्लादेशातील साधूची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दापोली शहर व तालुक्यातील सगळ्या हिंदू समाजाच्या प्रतिनिधी या मागणी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

